मराठी कविता संग्रह

करार

02:16 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !
संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !
विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !
मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !
सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !
खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !
मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !
लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !
नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !
जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !
हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !
समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !
एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !
भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !
मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !
तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !
खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !

' करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !



- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय